बेंगळुरू : वृत्तसंस्था कर्नाटक सरकारने शुक्रवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पातमाता मृत्युदर रोखण्यासाठी ३२० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अर्थसंकल्पीय दस्तऐवजानुसार, रोखता येण्याजोगा माता मृत्युदर शून्यावर आणण्याचा आमचा संकल्प आहे, असे सरकारने म्हटले आहे. राज्यात आरोग्यसेवेची गुणवत्ता सुनिश्चित करण्याच्या आपल्या हेतूचा पुनरुच्चार सरकारने केला. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज त्यांचा सोळावा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात विशेष तरतुदी करण्यात आल्या असून बेंगळुरू वर प्रामुख्याने भर देण्यात आला आहे.  त्याचबरोबर राज्यात इतर ठिकाणी सुविधांबाबत तरतुदी करण्यात आल्या आहेत. विधिमंडळ अधिवेशनाची सुरुवात ३ मार्च रोजी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या अभिभाषणाने झाली होती. कर्नाटक अर्थसंकल्पाचा एकूण आराखडा ४ लाख कोटी रुपये आहे, जो गेल्या वर्षीच्या ३.७१ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. कर्नाटक राज्याचा जीडीपी ७.४ टक्क्यांनी वाढला आहे आणि शेतीमध्येही ४ टक्के वाढ झाली आहे. राज्याचा जीडीपी ६. ने राष्ट्रीय वाढीपेक्षा जास्त झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की मेट्रो नेटवर्क केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत वाढवले जाईल. बेंगळुरूमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सरकारने हेब्बल एस्टीम मॉल ते सिल्क बोर्ड जंक्शनला जोडण्यासाठी १८.५ किमी लांबीचा उत्तर- दक्षिण बोगदा तयार करण्याची योजना आखली आहे. यासाठी अंदाजे १५,००० कोटी रुपये खर्च येणार आहे.

ब्रँड बेंगळुरू अंतर्गत २१ प्रकल्पांसाठी १,८०० कोटींचे वाटप. हवामानाशी संबंधित आव्हानांना हजार देण्यासाठी सुमारे ३ हजार कोटी आणि कावेरी पाणीपुरवठा प्रकल्पाच्या पाचव्या टप्प्यासाठी ५५५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की त्यांनी समाजातील सर्व जाती, वंश आणि वर्गातील लोकांच्या आकांक्षा पक्षपाती नसलेल्या पद्धतीने ऐकण्याचा प्रयत्न केला आहे आणि या अर्थसंकल्पाद्वारे त्यांना सकारात्मक प्रतिसाद देण्याचा प्रयत्न केला आहे. "माझा असा विश्वास आहे की अर्थसंकल्प हा केवळ कागदावरची गणना नाही, तर राज्यातील सात कोटी कन्नडगीगांचे भविष्य घडवण्यासाठी एक मॅन्युअल आहे. मला खात्री आहे की मी अर्थसंकल्पाद्वारे राज्यातील प्रत्येक नागरिकाला कोणत्या ना कोणत्या सरकारी योजनेचा लाभार्थी बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे, असे ते पुढे म्हणाले.