खानापूर / प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील नेरसा येथे शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील फणसाच्या झाडाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. काल गुरुवार दि. १३ फेब्रुवारी रोजी रात्री घडलेली ही घटना शुक्रवार दि. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी उघडकीस आली.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी, नेरसा येथील रहिवासी निलेश हैबतराव (बाळू) देसाई (वय ४३ वर्ष, सध्या रा. शिवाजीनगर खानापूर) हे काल गुरुवारी आपल्या नेरसा गावातील शेताकडे जाऊन येतो म्हणून गेले होते. परंतु ते रात्री खानापूर येथील घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांच्या पत्नीला आपले पती, गावाकडील आपल्या आई-वडिलांच्या घरी वस्तीला राहिले असतील अशी समजूत झाली. त्यामुळे त्यांनी सकाळी आपल्या पतीला फोन केला असता, फोन लागला नाही. त्यामुळे त्यांनी नेरसा येथील आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना याबाबत कळविले असता, त्यांनी शेताकडे जाऊन पाहीले असता ही घटना उजेडात आली.
0 Comments