विजयपूर / वार्ताहर
खेळताना वॉटर प्युरिफायरमध्ये पडून तीन मुलांचा मृत्यू झाला. विजयपूर शहरातील शांतीनिकेतन शाळेजवळ महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात सोमवार (दि. १३) मे रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणी महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कामातील बेजबाबदारपणामुळे मुलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल, आयपीसी कलम ३०४अ अंतर्गत महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत मुलांच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून आदर्शनगर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांच्या दुर्लक्षामुळे आमच्या मुलांचा मृत्यू झाल्याची तक्रार त्यांनी केली आहे. काल सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील वॉटर प्युरिफायरमध्ये पडून तीन मुलांचा मृत्यू झाला होता.
मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प महापालिकेच्या अखत्यारीत येतो. सदर युनिटला संरक्षक भिंत आणि गार्ड नसल्यामुळे ही दुर्घटना घडली आणि मुलांना जीव गमवावा लागला, असा संताप व्यक्त करण्यात येत होता.
0 Comments