आझाद गल्लीतील मोहन बडमंजी, परिवाराने
बेळगाव / प्रतिनिधी
देशरक्षणासाठी , स्वतःचे प्राण तळहातावर घेत सीमेवरती अहोरात्र सेवा बजावणाऱ्या सैनिकांमुळेच आपण सुरक्षित आहोत. पण टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही, ही म्हण सैनिकांच्या बाबतीत तंतोतंत खरी ठरते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
सैन्यात भरती होण्यासाठी उमेदवाराला अनेक चाचण्यांमध्ये उत्तीर्ण व्हावे लागते. प्रथम उमेदवाराच्या धावण्याची क्षमता पाहण्यात येते. यानंतर उमेदवार पात्र ठरल्यास त्याची संबंधित कार्यालयात नोंदणी होते. पुढे अडथळा शर्यत, दोरीच्या साह्याने उंच ठिकाणी चढणे या चाचण्यांमध्ये उमेदवाराला स्वतःला सिद्ध करावे लागते. यानंतर फायरिंगचे प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर कसम परेड होते आणि अखेरीस देशसेवेसाठी जवान तयार होतो.
0 Comments