खानापूर तालुक्यातील ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानच्या वतीने तालुक्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित एसएसएलसी व्याख्यानमालेची सांगता तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव समारंभ पार पडला.
कार्यक्रमात गेल्यावर्षी एसएसएलसी परीक्षेत तालुक्यातील हायस्कूल मध्ये सर्वोत्तम गुण मिळवणा-या विद्यार्थ्यांचा प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्याप्रमाणे विविध क्षेत्रातील मान्यवरांना ज्ञानवर्धिनी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पत्रकार निलीमा लोहार, डीडीपीआय लिलावती हिरेमठ, लैला शुगर्सचे एमडी सदानंद पाटील तसेच कल्लाप्पा ओबनगोळ यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना एसएसएलसी परिक्षेबाबत मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या.
खानापूर तालुक्यातील एसएसएलसीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठान मार्फत गेली सोळा वर्षे मोफत व्याख्यानमाला आयोजित करुन विषयानुरुप तज्ञ शिक्षकांकरवी मार्गदर्शन केले जात आहे. खेड्यापाड्यातील मुलांना एसएसएलसी संदर्भात मार्गदर्शन करुन तालुक्याचा निकाल शंभर टक्के लावण्याचा यामागचा उद्देश आहे.
कार्यक्रमात खानापूर बीईओ अंबगी, डॉ. गणपत पाटील, आशा गिरी, सुरेन हिरे त्याप्रमाणे निवृत्त शिक्षक आणि मुख्याध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments