- घरच्या मैदानावर टीम इंडियाला व्हाईटवॉश
- न्यूझीलंडचा ३-० च्या फरकाने मालिका विजय
मुंबई : भारताला घरच्या मैदानावर इतिहासातील मोठा लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला आहे. न्यूझीलंडने कसोटी मालिकेतील तिन्ही सामने जिंकत टीम इंडियाला व्हाईट वॉश दिला आहे. या पराभवासह भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत पहिले स्थान गमवावे लागले आहे. भारतीय संघ सलग तीन कसोटी पराभवांनंतर दुसऱ्या स्थानी आला आहे. भारताचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेतील टक्केवारी ५८.३३ टक्क्यांवर पोहोचली आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ ६२.५० टक्क्यांसह पहिल्या स्थानी कायम आहे.
या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. जिथे त्याने प्रथम फलंदाजी करत 235 धावा केल्या आणि त्याचा संघ सर्वबाद झाला. यानंतर भारतीय संघ फलंदाजीसाठी उतरला. त्याने पहिल्या डावात 263 धावा केल्या आणि 28 धावांची आघाडी घेतली.
भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या डावात जबाबदारी चोख पार पाडली आणि न्यूझीलंडला अवघ्या 174 धावांवर ऑलआउट केले. यासह किवी संघाने टीम इंडियाला विजयासाठी केवळ 147 धावांचे लक्ष्य दिले. यावेळी लक्ष्य खूपच लहान वाटत होते, परंतु न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी ते खूप कठीण केले.
मुंबई कसोटीच्या दुसऱ्या डावात 147 धावांचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघासाठी फलंदाजी सर्वात कमकुवत दुवा ठरला. ऋषभ पंतची 64 धावांची खेळी वगळता एकही फलंदाज क्रीझवर टिकू शकला नाही. 11 पैकी फक्त 3 फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. म्हणजे 8 फलंदाजांनी 10 पेक्षा कमी धावा केल्या.
दुसऱ्या डावात कर्णधार रोहित शर्माने 11 धावा केल्या आणि त्याची सलामीची जोडीदार यशस्वी जैस्वालने 5 धावा केल्या. विराट कोहली केवळ 1 धावा करून बाद झाला. त्यांच्याशिवाय शुभमन गिल आणि सरफराज खानने 1-1 धावा केल्या. रवींद्र जडेजा 6 धावा करून बाद झाला, वॉशिंग्टन सुंदर 12 धावा करून, अश्विन 8 धावा करून बाद झाला. आकाश दीप आणि सिराज यांना खातेही उघडता आले नाही आणि सामना 25 धावांनी जिंकला. हा सामना जिंकून न्यूझीलंडने इतिहास रचला आहे.
0 Comments