• गळफास घेऊन संपविले जीवन  

खानापूर / प्रतिनिधी 

कर्जबाजारीपणाला कंटाळलेल्या शेतकऱ्याने शेतवडीत झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. निटूर (ता. खानापूर) येथे बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. कल्लाप्पा बलराम  काजूनेकर (वय ५०) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सदर शेतकऱ्याने  कृषी पतीन सोसायटी, संघातून ग्रामीण विकास बँकेसह, विविध संघातून जवळपास दीड ते दोन लाखांपर्यंतचे कर्ज काढले होते. पण कर्ज फेडण्याची क्षमता नसल्याने काही दिवसांपासून तो शेतकरी मानसिक तणावाखाली होता. मंगळवारी रात्रीच्या सुमारास आपल्या शेतवडीत काजूच्या झाडाला गळफास घेऊन  त्याने आत्महत्या केल्याचे आढळून आले. या घटनेची नोंद खानापूर पोलीस स्थानकात झाली असून  पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी असा परिवार आहे.