- बसचे ब्रेक निकामी अन् प्रवासी किरकोळ जखमी
खानापूर / प्रतिनिधी
खानापूर - आमटे मार्गावर धावणाऱ्या केएसआरटीसी बसचे ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाला. गुरुवार (दि. १८ मे) रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आमटे नजीक ही घटना घडली. चालकाने प्रसंगावधान राखून रस्त्यानजीक असलेल्या काजूच्या बागेत नेलेली बस पलटी होता होता सावरल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर खानापूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, खानापूर आगारातून आमटे गावाकडे निघालेली खानापूर आमटे ही बस सायंकाळी साडे पाचच्या सुमारास कालमनी नजीक आली असता बसचे ब्रेक रिकामी झाला आणि चालकाचे बस वरील नियंत्रण सुटले. समोरून येणाऱ्या वाहनांना चुकविण्यासाठी चालकाने रस्त्यानजीक असलेल्या काजू बागेमध्ये बस वळविली आणि बसवर नियंत्रण आणले. यावेळी बसमधून जवळपास २५ ते ३० प्रवासी होते. सुदैवाने बस नपलटल्याने मोठा अर्थ टळला. मात्र प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. तसेच बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. याचबरोबर जखमींना तातडीने १०८ रुग्णवाहिकेतून अधिक उपचारासाठी खानापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
0 Comments