खानापूर / प्रतिनिधी 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खानापूर तालुका म. ए. समितीने इच्छुकांना दि. १० फेब्रुवारी रोजी २ वाजेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन केले होते.

या अनुषंगाने गेल्या दोन-तीन दिवसांपासून अनेकांनी आपले अर्ज दाखल करण्यास प्रारंभ केला होता.  आज १० फेब्रुवारी अखेरपर्यंत  एकूण सात अर्ज दाखल झाले आहेत.

त्यामध्ये मुरलीधर गणपतराव पाटील (जळगा), निरंजन उदयसिंह सरदेसाई (खानापूर), गोपाळराव मुरारी पाटील (गर्लगुंजी), पांडुरंग तुकाराम सावंत (गर्लगुंजी), आबासाहेब नारायण दळवी (मणतुर्गा), विलास कृष्णाजी बेळगावकर (कुसमळी), रूक्माण्णा शंकर झुंजवाडकर (खैरवाड) असे सात अर्ज दाखल झाले आहेत.

खानापूर तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांनी  सदर अर्ज स्वीकारले. यावेळी कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे, सचिव सिताराम बेडरे, खजिनदार संजीव पाटील यांच्यासह  समितीचे अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.

विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी  व महाराष्ट्र एकीकरण समितीचे संघटना बळकट करण्यासाठी गेल्या महिनाभरापासून या संदर्भात विचार विनिमय व चर्चासत्र सुरू आहे. यानुसार महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांनी ५१,०००/- रु. डिपॉझिट करून अर्ज करण्याचे आवाहन केले होते. यानुसार  ७ इच्छुकांनी समितीकडे अर्ज दाखल केले आहेत.