रायबाग / वार्ताहर 

रात्रीच्या वेळी शेतात बसवलेल्या मेंढ्यांच्या कळपावर लांडग्यांनी केलेल्या हल्ल्यात कळपातील सुमारे 25  मेंढ्यांचा मृत्यू झाला. ही घटना बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील बोम्मनाळ गावात शुक्रवारी रात्री घडली.

मल्लाप्पा हिरेकुडी यांच्या ह्या मेंढ्या आहेत. बोम्मनाळ गावातील रबकवी यांच्या शेतात त्यांचा कळप बसविण्यात आला होता. कळपाचा मालक मल्लाप्पा जेवणासाठी गेला असताना लांडग्यांच्या कळपाने त्यांच्यावर हल्ला करून 25 मेंढ्यांचा फडशा पाडला. या घटनेत मेंढपाळ मल्लाप्पा यांचे मोठे नुकसान झाले आहे.