•  आ.अभय पाटील यांची विधानसभेत मागणी

बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव शहरातील गरीब विणकर व मजुरांनी बॉण्ड पेपरवर खरेदी केलेल्या जमिनी अनधिकृत ठरवून मनपा किंवा बुडा त्यांना मूलभूत सुविधा देत नाहीत. या प्रश्नी बेळगाव दक्षिणचे अमर अभय पाटील यांनी आज विधानसभेत आवाज उठवला. बॉण्ड पेपरवर खरेदी केलेल्या जमिनी अधिकृत करून त्यांना मूलभूत सुविधा देण्याची मागणी त्यांनी केली.

त्याला उत्तर देताना महसूल मंत्री आर. अशोक म्हणाले की, राज्यातील बांधकाम व्यावसायिकांनी स्वत:च्या फायद्यासाठी सरकारी नियमांची पायमल्ली करून केवळ बाँड पेपरच्या कराराद्वारे जमिनी विकून गरीब जनतेची फसवणूक केली आहे, त्यामुळे सरकारी तिजोरीचे नुकसान झाले आहे. तसेच जर अशाप्रकारे गरिबांनी जमीन खरेदी केल्यास त्यांना स्थानिक स्वराज संस्थांकडून मुलभूत सुविधा मिळत नाहीत, असे स्पष्ट करून याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन राज्यात एकाच वेळी अशा अनधिकृत जमिनी नियमित करण्याची संधी दिली जाईल, असे ते म्हणालेयावर आ. अभय पाटील यांनी हे काम लवकरात लवकर व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.