खानापूर / प्रतिनिधी 

बेळगाव येथे कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला विरोध म्हणून दरवर्षी बेळगावात मराठी भाषिकांच्यावतीने समितीच्या नेतृत्वाखाली महामेळाव्याचे आयोजन करण्यात येते. त्याचप्रमाणे यावर्षीही, सोमवार दिनांक ९ डिसेंबर रोजी सकाळी ११  वाजता बेळगाव येथे महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सीमाभागातील लोकांनी मोठ्या प्रमाणात बेळगाव येथील महामेळाव्याला उपस्थित राहावेत, म्हणून सर्वत्र महामेळाव्याची जनजागृती करण्यात येत आहे.  या पार्श्वभूमीवर गुरूवार दिनांक ४ डिसेंबर रोजी आठवडी बाजाराच्या निमित्ताने जांबोटीपेठ आणि गावात महामेळाव्याच्या जनजागृती बाबतची पत्रके वाटून महामेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन म.ए समितीचे नेते व पदाधिकाऱ्यांनी केले. यावेळी लोकांनी मोठ्या प्रमाणात महामेळाव्याला उपस्थित राहण्याचा निर्धार व्यक्त केला. मेळाव्याचे ठिकाण ऐनवेळी जाहीर करण्यात येणार आहे.

यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई, माजी तालुका पंचायत सभापती मारुतीराव परमेकर, रवींद्र शिंदे, राजू चिखलकर, कृष्णा देसाई, मोहन देसाई, राजाराम देसाई, रवींद्र देसाई, शंकर काजुनेकर, अरुण देसाई, विठ्ठल राजगड, पंडित नावलकर खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती अध्यक्ष गोपाळराव देसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, गोपाळ पाटील, राजाराम देसाई, विनोद राठोड, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.