• चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात
  • बिडी - कित्तूर मार्गावरील घटना  

खानापूर / प्रतिनिधी 

खानापूर तालुक्यातील बिडी-कित्तुर रस्त्यावर कार झाडावर आढळल्याने कारमधील ६ प्रवाशांचा मृत्यू झाला तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. कार क्रमांक MH 12 EX 3052 मधुन एकूण दहा जण प्रवास करत होते. बिडीजवळील गोल्याळी गावातील आपल्या नातेवाईकांकडे होलीमा कार्यक्रमासाठी जात असताना ही घटना घडल्याचे समजते, याबाबतची माहिती समजताच नंदगड पोलीस घटनास्थळी पोहोचले व जखमींना ताबडतोब उपचारासाठी बेळगावला पाठविले. तर गाडीतील मृत व्यक्तींचे, मृतदेह शव विच्छेदनासाठी खानापूर येथील प्राथमिक आरोग्य चिकित्सा केंद्रात आणण्यात आले.

प्राथमिक माहितीनुसार, खानापूर तालुक्यातील नंदगड पोलीस स्थानकाच्या  हद्दीत असलेल्या मंग्यानकोप गावाजवळ गुरुवारी 22 फेब्रुवारी रोजी, दुपारी झालेल्या अपघातात दोन पुरुष व ३ महिला व एका १३ वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाला आहे. कित्तूर – बीडी मार्गावरून गोल्याळी गावाकडे जाणाऱ्या प्रवासी कारचे मंग्याननकोप्प गावाजवळील रस्त्याच्या कडेला असलेल्या वळणावर नियंत्रण सुटून भरधाव वेगात असलेली कार रस्त्यालगतच्या झाडावर आढळल्याने हा अपघात झाला आहे.

या अपघातात एकूण सहा जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये शाहरुख पेंढारी ड्रायव्हर ( वय ३०) रायबाग, इकबाल जमादार (वय ५०), सानिया लंगोटी (वय ३७), उमरा बेगम लंगोटी (वय १७), शबनम लंगोटी (वय ३७) फरान लंगोटी (वय १३) हे मृत पावले आहेत.

तर या अपघातात एकूण चार जण गंभीर जखमी झाले असून त्यामध्ये फरहा बेटगिरी (वय १८ ), सोफिया लंगोटी (वय २२), सानिया इकबाल जमादार (वय ३६), माहीम लंगोटी (वय ७), या अपघाताबाबत नंदगड पोलीस स्थानक व खानापूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करत आहेत.

हरूगेरी (हुक्केरी) येथील कुटुंब काल धारवाड या ठिकाणी आपल्या नातेवाईकांच्या लग्न समारंभासाठी आले होते. काल लग्न समारंभ झाल्यानंतर, आज खानापूर तालुक्यातील गोल्याळी गावाकडे होलीमा कार्यक्रमासाठी, आपल्या धारवाड येथील नातेवाईकासोबत येत असताना सदर दुर्घटना घडली असल्याचे समजते. या अपघातातील मृत व जखमी हरूगेरी व धारवाड येथील असल्याचे समजते.