•  जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचा आदेश

बेळगाव / प्रतिनिधी

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या काळ्यादिनी सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातून तीन मंत्री आणि खासदार येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर  जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी ३१ ऑक्टोबर सकाळी ६ वाजल्यापासून ते २ नोव्हेंबर सायंकाळपर्यंत बेळगाव जिल्ह्यात प्रवेश बंदीचा आदेश जाहीर केला आहे.

महाराष्ट्राचे मंत्री शंभूराज देसाई, चंद्रकांत दादा पाटील,दीपक केसरकर आणि खासदार धैर्यशील माने यांना बेळगाव शहर आणि जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घातली असल्याचे या देशात नमूद केले आहे.

एक नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र एकीकरण समिती काळा दिन पळून रॅली काढून नंतर मराठा मंदिर येथे सभा आयोजित करणार आहे.  या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मंत्री शंभूराज देसाई, चंद्रकांत दादा पाटील, दीपक केसरकर आणि खासदार धैर्यशील माने येणार असल्याची शक्यता आहे. त्यांच्या भाषणामुळे कन्नड आणि मराठी भाषिकांमध्ये तेढ निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवून सार्वजनिक संपत्तीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच या नेत्यांना कन्नड संघटनेचे कार्यकर्ते घेराव घालण्याच्या शक्यतेने बेळगाव जिल्हा बंदीचा आदेश जारी केल्याचे जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे.