रेणुका देवी सौंदत्ती (यल्लम्मा) यात्रा संपून येळ्ळूर चे भाविक गावाच्या बाहेर माळ्यातील यात्रा महोत्सव हणमंत गौड नगर साजरा केला जातो. यावेळी जो काही कचरा निर्माण होतो. त्यासाठी येळ्ळूर ग्राम पंचायतीने यात्रे ठिकाणी प्रत्येक कुटूंभाला कचरा जमा करण्यासाठी कचरा पाशवीची व्यवस्था केले होती. भाविकांना आव्हान केले होते की कचरा पिशवीत जमा करावा. भाविकांनी सुद्धा ग्राम पंचायतच्या आव्हानाला चांगला प्रतिसाद दिला व ग्राम पंचायतचे कौतुक केले. आज सकाळी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. व तो परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील,सदस्य प्रमोद पाटील,शिवाजी नांदूरकर,रमेश मेनसे,परशराम परीट,सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील,अजय पाटील, ग्राम पंचायत कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments